इतिहासाचे साक्षीदार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
इतिहासाचे साक्षीदार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९

सुतोंडा (नायगावचा किल्ला)

सुतोंडा (नायगावचा किल्ला )
1 मे महाराष्ट्र दिन महाराष्ट्राच्या आणि मराठी मनाचा अभिमानाचा दिवस, महाराष्ट्राला लाभलेले ऐतिहासिक, सांस्कृतिक,नैसर्गिक वारसा खूप मोठा आहे. आणि महाराष्ट्र दिनाच औचित्त्य साधून सुतोंडा किल्ल्यावर जायच अस मी 30 तारखेला ठरवल मित्राणा फोन पन झाले पन सगळ्यांचे वेगळेच प्लान ठरलेले मग काय जायच तर होतच आणि आणि एकत्यानेच हा सोलो ट्रेक करायच ठरल
ऊन खूप आहे म्हणून सकाळी लवकरच जायचा पालन केला. आणि सकाळी 5 ला उठून प्रवासाला सुरुवात झाली. ट्रेक पार्टनर माझी बाईक.
 पायथ्यापासून दिसणारा नायगावच्या किल्ला 

सुतोंडा हा किल्ला औरंगाबाद पासून 120 km अजिंठा सातमाळ डोंगररांगेत असणारा सुतोंडा, सायीतोडा, वाडी किल्ला, वाडीसुतोंडा किल्ला, नायगांव किल्ला, वाडी किल्ला या नावांनी परिसरात ओळखला जातो. किल्ला आताच्या स्थितीत जरी दुर्लक्षित असला तरी किल्ल्यावरील इमारती,वाड्याचे अवशेष,बुरुज,कोरीव पाण्याचे टाके,किल्ल्यावरील ढासलेले दरवाजे,किल्ल्यावरील लेणी आजही तग धरून इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. किल्ल्याचे पायथ्याचे गाव नायगाव आहे. 
किल्ल्यावरील लेणी 
1 मे महाराष्ट्र दिन या दिवशी मी या किल्ल्यावर जाण्यासाठी निघालो एकटा असल्याने आणि किल्ल्यावरील आदबाजूची लेणी बघण्यासाठी म्हणून गावातून एक वाटाड्या सोबतीला घेतला गावातुन 15 मीन. च्या अंतरावर किल्ला लागतो. आम्ही आधी लेणी बघणाच्या उद्देशाने चोर दरवाच्या च्या बाजूने गेलो. अर्ध्या वर किल्ला चढल्यानंतर एक लेणी दिसते, जोगवा मागणारीच लेणी अस या लेणीच नाव मी वाचल होत पण गावकरी त्या लेणीला जोगणा मांगीनच घर किंवा लेणी अस म्हणतात अस तो वाटाड्या सांगत होता. 

किल्ल्यावरील मशिदीची  इमारत आणि  पाण्याचे टाके 
जैन लेणी असून लेणीच्या मागच्या बाजूस कोरीव काम असून लेणीच्या बाहेरील बाजूस दोन मुर्त्या बघायला मिळतात. वरच्या बाजूस जैन महावीराची प्रतिमा कोरलेली दिसते. लेणी पाहून आम्ही तिथूनच वर किल्ल्यावरील चोर दरवाज्याने किल्ल्यावर पोहचलो. चोर दरवाज्याच्या बाजूच्या भिंती पडल्या असून फक्त चोर दरवाचा तेवढा शिल्लक आहे. तेथूनच उजव्या बाजूस किल्ल्यावरील इमारतीचे अवशेष पाहायला मिळतात तसेच किल्याची लांबून दिसणारी तटरक्षक भिंत ही पाहायला मिळते. ती पाहुन परत चोरदरवाज्याच्या डाव्या बाजूस दिसणारा किल्ल्यावरील एकमेव शाबूत बुरुज पाहायला मिळतो. 
पाण्याचे टाके 
बुरुज पाहून वर गेलं की किल्ल्यावरील मशिदीची पडकी इमारत पाहायला मिळते. त्याच्याच बाजूला दोन पिराच्या कबरी आहेत आणि त्याच्या समोरच एक 20 ते 25 कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाक्यांचा समूह दिसतो. या टाक्यांमध्ये पाणी नाहीए. या पाण्याच्या टाक्या पाहून डाव्या बाजूने वरच्या दिशेष आणखी काही इमारतीचे अवशेष पाहायला मिळतात. तिथूनच पुढे आणखी काही कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. मी पाहिलेल्या औरंगाबाद च्या किल्ल्या पैकी सगळ्यात जास्त पाण्याच्या कोरीव टाक्या असणारा हा एकमेव किल्ला आहे. ते पाहून आणखी डाव्या बाजूने खालच्या अंगाला 6 ते 7 खांब असणार अंदाजे 25 ते 30 फूट कोरीव प्रशस्त पाण्याचं टाक पाहायला मिळत या टाक्यात भरपूर पाणी आहे. 
किल्ल्यावरील  पाण्याचे टाके  
ते  टाक पाहून समोरच काही अंतराच्या पायवाटेवर आणखी एक  12 कोरीव खांब असणार तीन भाग असणार पाण्याच प्रशस्त टाक पाहायला मिळत याच टाक्याच्या आतील भागात आणखी एक कोरीव टाक पाहायला मिळत या टाक्यात पाणी असलं तरी पाणी पिण्या योग्य नाहीए,गावातील लोक या टाकीस सीताची नहानी म्हणतात. तेथून डाव्या बाजूस आणखी एक 13 तुटलेल्या खांबाच कोरीव पाण्याचं टाक पाहायला मिळत या टाक्यातील पाणी स्वच्छ असून ते पाणी पिण्यायोग्य आहे. 
कातळात कोरलेले  किल्ल्याचे द्वार 
टाक्याच्या डाव्या बाजूस एक दगडी खिडकी आहे. हे टाक पाहून आम्ही किल्ल्याच्या मुख्य दरवाच्या कडे गेलो दरवाचा पूर्ण ढासळलेल्या स्थितीत आहे. याच दरवाज्यातून आम्ही खाली उतरायला सुरुवात केली असता कातळ कोरून एक खिंड केलेली पाहायला मिळाते. खिडीतून आणखी बाहेर जाताना काटकोनात बसवलेले प्रवेश द्वार पाहायला मिळतात. तेथून बाहेर आला की ही किल्ल्याची मुख्य प्रवेशद्वाराची बाजू पाहायला मिळते पूर्ण डोंगर तोडून हे मुख्य द्वार तयार केलेले दिसते. कातळभिंतीच्या वर दगडी तटबंदी आहे त्याच्या वरच डाव्या बाजूस शरभ शिल्प कोरलेले पाहायला मिळते. या बाजूने डोंगराला वेढा घालून मुख्य प्रवेशद्वारातून किल्ल्यावर जाण्यासाठी सोपा रस्ता आहे पण आम्ही लेणी बघण्यासाठी चोरवाटेच्या मार्गाने किल्ल्यावर गेलो हा रस्ता चढायला अवघड आहे.
विष्णूची मूर्ती 

गावातील एक झाडाखाली ठेवलेली विष्णूची एक जुनी मूर्ती पहायला मिळते ही मूर्ती गावातील एका शेतात सापडलेली आहे अस मला त्या गावातील व्यक्तीने सांगितल मूर्ती काढतानाच तिचा एक हात तुटला होता आणि आताच्या स्थितीत ही मूर्ती खूप दुर्लक्षित आहे.

रविवार, २३ डिसेंबर, २०१८

सोनेरी महाल - Soneri Mahal

परीक्षा संपली आणि कॉलेज ला एका  महिन्याची सुट्टी जरी मिळाली असली तरी मी ऑफिस च्या बदललेल्या वेळेमुळे ईच्छा असुनहि कुठेच जाऊ शकत नव्हतो आणि एका शुक्रवारच्या मिळालेल्या सुट्टीचा पुरेपूर वापर करण्यासाठी म्हणून रूम पासून काहीच अंतरावर असणाऱ्या सोनेरी महाल हि ऐतिहासिक वास्तू  बघायचा विचार माझ्या मनात आला आणि आणि त्या पुढच्या अर्ध्या तासात मी सोनेरी महालापाशी  होतो. 
प्रवेशव्दार (हाथीखाना )
औरंगाबाद शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या परिसरात आहे. महालाच्या आतील नक्षी,आणि चित्र सोन्याच्या पाण्याने रंगववाल्याने या वस्तूला सोनेरी महाल हा हे नाव प्राप्त झाले. औरंगाबाद मधील अनेक मौल्यवान ऐतिहासिक वास्तू पैकी एक असणारी हि वास्तू  बीबी का मकबरा मकबऱ्यापासून काहीच अंतरावर असली तरी इथं पर्यटकांची गर्दी जरा कमीच दिसते. ही वास्तु आता महाराष्ट्र पुरातत्व खात्याच्या अधीन असून प्रवेश शुल्क ३ रु. प्रति व्यक्ती आकारण्यात येते. 
सोनेरी महालाचे प्रवेशव्दाराचे दगडी असून भारदस्त आणि आजही भक्कम आहे, या व्दारास हाथीखाना असे म्हणतात. प्रवेशव्दारातून आत जाताच आपल्यलाला सोनेरी महाल आणि महालाची  शोभा वाढवणारी महालाच्या मागच्या बाजूने असणारी गोगाबाबा टेकडी दिसते. तर पुरातत्व विभागाने लावलेला सोनेरी महालाची माहिती देणारा फलक मला पहा मला पहा जणू असंच बोलतो.. त्या फलकावरील काही माहिती 
Soneri mahal,Aurangabad
प्रवेशव्दारातून आत जाताच दिसणार सुंदर दृश्य 
" औरंगजेबासोबत दख्खनमध्ये आलेल्या बुंदेलखंडातील सरदारने हा महाल बांधला. काही उपलब्ध पुराव्यांवरून असे कळते की शहाजहानने पहाडसिंग व झुंजारसिंग या दोन भावांना दख्खनला पाठवले होते. औरंगजेबाच्या काळात वेळोवेळी पराक्रम गाजवून पहाडसिंगने मुघल साम्राज्याला आपली निष्ठा दाखवून दिली. पुढील काळात त्याने औरंगाबाद येथील सोनेरी महालात वास्तव्य केले. या पुराव्याला अजून एक आधार असा की, सोनेरी महालाच्या बाहेर पहाडसिंगचा सावत्र भाऊ लाला हरदौल यांचे स्मृतिस्मारक आहे.
सोनेरी महाल हे स्मारक इ.स. १६५१ ते १६५३ च्या दरम्यान बांधले गेले असावे. ही इमारत बांधण्यासाठी त्यावेळी ५०,००० रुपये खर्च आला होता. १९३४ साली मूळ किंमतीचा अंदाज घेऊन हैदराबाद संस्थानाच्या तत्कालीन निजामाने हा महाल ओरछाच्या सवाई महेंद्र वीरसिंहदेव बहादुर यांच्याकडून २६,४०० रुपयांना विकत घेतला."
Soneri mahal,Aurangabad
सोनेरी महल 
मुख्य प्रवेशव्दारातून महालाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस बाग आहे तर रस्त्याच्या मधोमध लांबच लांब असा पाण्याचा पाण्याचा जलाशय दिसतो.
सोनेरी महालाच्या मुख्य चोथऱ्यावर जाण्या साठी पायऱ्या आहेत आणि त्यांचंच दोन्ही बाजूस दोन तोफा ठेवलेल्या आहेत तर चोथऱ्यावर तीन वेगवेगल्या प्रकारच्या तोफा बघायला मिळतात. 
या महालात आता वास्तू संग्रहालय सुद्धा आहे. मराठवाड्यातुन विविध ठिकाणावरून आणलेल्या मुर्त्या,वस्तू आपल्याला बघायला मिळतात. महालाच्या आत शिरताच प्रवेशशुल्क भरून उजव्या बाजूस लाकडी फळीवरील चित्रांच दालन आहे. यामध्ये  कृष्ण,राम महादेव,नेसर्गिक,झाड,फुल पक्षी याच्या पेंटिंग्स चा समावेश आहे. सगळी चित्र १७ व्या ते १८ व्या शतकातील आहेत, याच दालनाच्या पुढे काचेवरील चित्रांच दालन आहे. 
सोनेरी महलापासुन दिसणार हाथीखाना 

त्याच्या समोर आपल्याला सोनेरी महालातील मुख्य आणि या महालाचा मुख्य भाग बघायला मिळतो. महालातील सोनेरी रंगातील सुंदर नक्षी आणि मुघल स्थापत्य कलेचा नमुना असणाऱ्या कमानी बघायला मिळतात. हे बघून पुढं गेलं कि तांब्याच्या विविध वस्तू आणि मुर्त्या बघायला मिळतात. त्याच्या पुढे असणार दगडी शिल्पाचं दालन तर लक्ष वेधून घेत. या दालनातील काळ्या कातळातील शिल्प औढा ,हिंगोली येथील असून मला बाकी शिल्प जालना,सिल्लोड,चारठाणा, नगर, उस्मानाबाद येथील आहेत. यामधील चामुंडा देवीचे शिल्प मला अधिक आकर्षक वाटले. हे शिल्प परळी वेजेनाथ येथून आणले असून मूर्तीवरील नाजून काम विलोभनीय आहे.  विविध भाषेतीत शिलालेख सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात. या दालनाच्या मधोमध एक लाकडी त्रिमुखी गणेशा बघायला मिळतात. डाव्या बाजूस विविध प्रकारच्या लहान लहान तोफांच दालन असून यामध्ये बंदुकीच्या आकाराच्या तोफा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकाने एक वेळ नक्की या वास्तू भेट द्यायलाच हवी... 
शेवटी जाताना घेतलेला एक फोटो 
                                              

सुतोंडा (नायगावचा किल्ला)

सुतोंडा (नायगावचा किल्ला ) 1 मे महाराष्ट्र दिन महाराष्ट्राच्या आणि मराठी मनाचा अभिमानाचा दिवस, महाराष्ट्राला लाभलेले ऐतिहासिक, सांस्कृतिक...